Monday, March 5, 2018


विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी
प्रशासन कटिबद्ध - जिल्हाधिकारी रु डोंगरे
नांदेड दि. 5 :- विद्यार्थ्यांसाठी अभ्यास-मुलाखत मार्गदर्शनसराव चाचणी परीक्षेसोबत त्यांचेवरील मानसिक स्थितीचा विचार करुन ताण-तणावाचे व्यवस्थापनसर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन टिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रु डोंगरे यांनी केले.
            स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने "उज्ज्वल नांदेड" मोहिम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड मनपा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित दरमहा 5 तारखेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरा जिल्हाधिकारी श्री डोंगरे आज बोलत होते.
            यावेळी सुप्रसिद्ध मानसोपचार ज्ज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले, पुणे येथील प्रा. अभिजित राठोड, नायगावचे मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, प्रा.जगदीश राठोड, गणेश कऱ्हाडकर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पहिल्या सत्रातील प्रमुख वक्ते डॉ. मुलमुले यांनी ताणतणावाचे व्यवस्थापन सुखाचा शोध या विषयावर विद्यार्थ्यांना आपल्या खुसखुशीत विनोदी शैलीत मार्गदर्शन केले. डॉ. मुलमुले यांनी विद्यार्थ्यांना यशाचा सतत ध्यास करणे आवश्यक असल्याचे सांग अपयशाचा किंचतही विचार करता आनंदी मनाने पुढे मार्गक्रमण करावे, असे सांगीतले. सुखाचा शोध म्हणजे नेमके काय ? याबाबत पद, पैसा, प्राप्तीनंतरही आनंद मिळता आणखी काही मिळविण्याची लालसा, ईर्षा याबाबी माणसांना सुखी करता दु:खीच करीत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. यासाठी कोणत्याही बाबतीत समाधानी असणे म्हणजे सुखी असणे होय असे डॉ. मुलमुले म्हणाले.
            दुसऱ्या सत्रा प्रा. राठोड यांनी राजकोषिय धोरण, वित्तीय तूट अर्थसंकल्प 2018 याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अर्थसंकल्पाची रचना, शुन्याधारित अर्थसंकल्प, फलनिष्पती अर्थसंकल्प, लिंगाधारित अर्थसंकल्प याविषयी माहिती दिली. सोबत राजकोषीय व्यवस्थापन, वित्तीय तूट यांचे परीक्षेसंबध महत्व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
सुत्रसंचलन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे यांनी यांनी केले तर आभार आरती कोकुलवार यांनी मानले. सुरुवातील श्री कऱ्हाडकर यांच्या मराठी शब्दसंग्रह ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिब यशस्वीतेसाठी प्रताप सुर्यवंशी, संजय कर्वे, कोंडीबा गाडेवाड, मुक्तीराम शेळके, मयुर कल्याणकर, लक्ष्मण शेन्नेवाड, मनोज उरुडवाड रघुवीर श्रीरामवार यांनी संयोजन केले.
00000


"उज्ज्वल नांदेड" अंतर्गत आज
पर्यावरण परिस्थितीवर मार्गदर्शन    
नांदेड, दि. 5 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या उज्ज्वल नांदेड अभियानांतर्गत मंगळवार 6 मार्च 2018 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे करण्यात आले आहे.
या शिबिरात पुणे येथील डॉ. तुषार घोरपडे हे पर्यावरण परिस्थिती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मनपा आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची उपस्थिती राहणा आहे. या शिबिरास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.
0000


लोकशाही दिनाचे 5 मार्चला आयोजन
नांदेड, दि. 5 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 5 मार्च 2018 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पुढील महिण्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.                             
00000


वंचित शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीचे
अर्ज करण्यास 31 मार्चची मुदत
नांदेड, दि. 3 :-  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतर्गत यापुर्वी विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 1 ते 31 मार्च 2018 यादरम्यान उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे  दि. 28 फेब्रुवारी, 2018 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला  असून या आदेशाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी 31 मार्च, 2018 पर्यंत  आपले सरकार या सेवा केंद्रावर किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आय.डी. व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.
पीक कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमाफी व पीक कर्ज प्रोत्साहनपर लाभ योजना 28 जून 2017 चे शासन निर्णयान्वये जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी 1 एप्रील 2009  ते 31 मार्च 2016  या कालावधीत पीक कर्ज  घेतलेल्या  व अशा कर्जापैकी   30 जून 2016  रोजी थकबाकीदार आहे त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. याव्यतिरिक्त 2015-16 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची उचल करुन मुदतीत परतफेड केली आहे. तसेच 2016-17 पुन्हा कर्जाची उचल करुन 31 जुलै 2017 अखेर परतफेड केली आहे अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजारांच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र काही शेतकरी वैयक्तिक कारणाने किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन अर्ज करु न शकल्यामुळे कर्जमाफीच्या योजनेत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांना लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानूसार आता 1 मार्च, 2018 ते 31 मार्च, 2018 दरम्यान   आपले सरकार  पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी स्वत: किंवा आपले सरकार पोर्टलवर माहिती भरुन ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा नि:शुल्क आहे. यासाठी अर्ज करणारा शेतकरी व त्यांच्या कुटुबांचे प्रमाणिकरण आधार क्रमांकाच्या आधारे बायोमेट्रिक पध्दतीने  किंवा मोबाईल ओटीपीद्वार केल्यानंतर संबंधत अर्ज अपलोड करण्यात येणार आहेत.
कर्जमाफी योजनेअंतर्गत यापुर्वी विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी दि. 31 मार्च 2018 पर्यंत आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आय.डी. व पासवर्डच्या अधारे ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन प्रवीण फडणीस, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.  
000000


महिला दिनानिमित्त
आरोग्य तपासणी शिबीर
नांदेड, दि. 5 :- जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 78 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 यावेळेत स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड व जिल्हा रुग्णालय छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ वजिराबाद नांदेड येथे 30 वर्षावरील सर्व स्त्रियांसाठी उच्चरक्तदाब, महुमेह व स्त्रीगर्भाशय कर्करोग संबंधीत (PAP SMEAR) तपासणी करण्यात येणार आहे. तसेच जनजागृतीपर पोस्टर्स प्रदर्शन करण्यात येणार असून हे प्रदर्शन 7 8 मार्च रोजी सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. सर्वांनी या तपासणी शिबीर व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.
000000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...