Wednesday, January 18, 2017

मतदार जागृती चित्रकला स्पर्धेत मालेगावातील
समीरच्या चित्राला राष्ट्रीयस्तरावर नामांकन
नांदेड, दि. 18 :- भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय मतदार जागृती अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या चित्रकला स्पर्धेत राज्यातून राष्ट्रीयस्तरावर पाठविण्यात आलेल्या नामांकनात नांदेडच्या मालेगाव (ता.अर्धापूर) येथील शेख समीर जिलानी याच्या चित्राचा समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस "राष्ट्रीय मतदार दिवस" दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने आयोगाने यावर्षी आयोगाने विविध स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना आयोगाने दिलेल्या होत्या. त्यामध्ये 15 ते 18 या वयोगटातील विध्यार्थ्यासाठी "महत्व एका मताचे" या विषयावर चित्रकला स्पर्धां घेण्याचे सूचित करण्यात आलेले होते.
त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. प्रत्येक तालुक्यातून दोन उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यात आली. सर्व तालुक्यातील उत्कृष्ठ चित्रांमधून जिल्हास्तरावर दोन उत्कृष्ट चित्र निवडून ती राज्यस्तरावर पाठविण्यात आली होती. राज्यस्तरावरून 36 जिल्ह्यातून प्राप्त चित्रांमधून 4 चित्रांचे नामांकन राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कारासाठी पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील कै. मुंजाजी पाटील विद्यालय या शाळेतील शेख समीर जिलानी या विद्यार्थ्याच्या चित्राची राज्यस्तरावर निवड करण्यात येऊन, त्याचे राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मा. मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांनी केलेले आहे. राज्यातून राष्ट्रीयस्तरावर पाठविण्यात आलेल्या चित्रात नांदेडसह परभणी, यवतमाळ व पालघर जिल्ह्यातून प्रत्येकी एका चित्राचा समावेश आहे.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इ स्पर्धांचेही आयोजन करण्यात आलेले होते. याशिवाय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यादृष्टीने जिल्ह्यात हायस्कूलमध्ये मतदान यंत्राचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येत आहे. या समीरच्या या यशासाठी, त्याचे जिल्हा निवडणूक विभागाने अभिनंदन केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्‍त क्र. 378   आज संध्याकाळी प्रचार तोफा थंडावणार   बुधवारी सायंकाळी 6 वाजेपासून शांतता कालावधीला सुरुवात होणार   जिल्ह्यामध...