Wednesday, January 4, 2017

लेख
शासकीय जनसंपर्कात सोशल मीडियाचा वापर : एक अभ्यास
                                                                                                       --डॉ.वि.. धारुरकर
                        शासकीय जनसंपर्क हा विकास आणि सामाजिक न्यायाच्या संदर्भात एक महत्वाची संवाद प्रक्रिया असते. शासनाचे संकल्प, विकास कार्यक्रम आणि विविध प्रकारचे रचनात्मक निर्णय हे सामान्य जनतेपर्यंत थेट पोहचविण्याची एक माहिती  तंत्रज्ञान हे वरदान ठरले आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकारची विकास कामे लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न माहिती तंत्रज्ञानाचे वाघिणीचे दुध पोषक ठरले आहे. मागील वाटचाल आणि सध्याची कामगीरी याचा विचार करता महाराष्ट्राच्या  कामात बदल झाला आहे. याचे प्रतिबिंब नव माध्यमातून प्रकट होत आहे. शासन जनतेच्या दारापर्यंत पोहचले आहे आणि लोकांच्या सर्व प्रकारच्या सामाजिक व आर्थिक गरजा या महाऑनलाईन  या संकेतस्थळावरून दिले जात आहे.
आपले सरकार या संकेतस्थळावर सरकारच्या सर्व सेवा उपलब्ध आहेत. महाराष्ट्र हे अशा प्रकारची माहिती व सेवा देणारे देशातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्र राईटर पब्लिक सर्व्हीस ॲक्ट हा क्रांतिकारक कायदा सरकारने संमत केला आणि माहितीच्या अधिकाराच्या पुढे आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून एक वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व निर्णय ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महसूल खात्यापासून ते शिक्षणापर्यंत आणि जलसंपदेपासून ते ऊर्जा वितरणापर्यंत सर्व सेवा जनतेसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. शिवाय ब्लॉग, टि्टर आणि व्हॉस्टॲप द्वारे सर्व महत्वाचे निर्णय जनतेपर्यंत पोहचविले जात आहे.
लोकांना आपल्या तक्रारी ,सूचना आणि शिफारसी करण्याची खुले अपील या नात्याने या नवमाहिती तंत्रज्ञानाचे महत्व तसेच सरकारी सहाय्य व सामाजिक न्यायाच्या प्रमुख योजना तालुका व ग्राम पातळीपर्यंत पोहचवितात. थेट बँक हस्तांतरण पध्दती ही अनेक दृष्टीने लाभप्रद ठरली आहे.गती (Speed), कार्यक्षमता (effceincy) आणि पारदर्शकता (transperncy) ही आपल्या प्रशासनाची त्रिसूत्री आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी शपथग्रहणानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते या तत्वांचे पालन त्यांनी काटेकोरपणे व कसोशीने केले आहे.
            शासनाच्या जिल्हा माहिती कार्यालयापासून ते  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयापर्यंत प्रत्येक निर्णय हा प्रगत संदेश वहन यंत्रणेव्दारे पोहचविला जात आहे. विभागीय माहिती कार्यालयाचे संदेश हे लक्ष श्रोता व ग्रामीण समुदायापर्यंत पोहचवितांना इंटरनेट तसेच मोबाईल ॲपव्दारे संपर्क केला जात आहे. शिवाय आंतर प्रक्रीयात्मक संकेत स्थळाद्वारे व भावनांच आदान - प्रदान केले जात आहे. त्यामुळे लोक भावनांचे प्रतिबिंब प्रभावीपणे उमटत आहे. आकाशवाणीवरील दिलखुलास कार्यक्रमामधील विकास संवादाबरोबरच माहिती प्रबोधानावर दिला जात आहे. तसेच जय महाराष्ट्र या दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरील संदेशाव्दारे राज्यातील प्रगती व विकासाचे चित्र प्रकटले जात आहे दृकश्राव्य साधनांचा जनसंपर्कामध्ये वापर वाढत आहे. मुद्रित माध्यमांचा आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा समन्वय साधून शासनाच्या विविध विकास कामांचे प्रतिबिंब यथार्थपणे उमटविले जात आहे, ही बाब जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रशंसनेस पात्र आहे महान्यूज पोर्टलचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. त्याला आद्ययावत रुप देण्यात आले आहे. त्यामुळे आंतरक्रिया जनसंपर्काची व्याप्ती वाढली आहे.
 महाराष्ट्र बदलतो आहे आणि या समग्र बदलाची क्षेत्रे कृषी, उद्योग आणि शिक्षण तसेच माहिती तंत्रज्ञान आणि रस्ते दळणवळण पेयजल सिंचन उर्जा संवाद अशा अनेक क्षेत्रामध्ये शासनाने दमदार पावले टाकली आहेत. जलयुक्त शिवार ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आदर्श आणि दीर्घ कालीन फायदाची आहे. व्यापक लोक सहभागातून ही योजना अधिक सफल ठरली आहे. या योजनेची आणखी अंमलबजावणी आणि कार्यसमन्वयातून नवे धवल यश सिध्द झाले आहे. सुमारे सात- आठ महिने ही योजना पूर्वपरंपरेनुसार आखण्यात आली आणि जलसाधनेतून ही योजना सफल करण्यात आली आहे. सोशल मीडियाद्वारे जल साक्षरतेचे संदेश लक्ष गटापर्यंत पोहचविण्यात आले आहेत .व्हॉस्टॲप आणि ब्लॉगव्दारे जनमतांची मशागत करण्यात आली आहे. म्हणून योजनांच्या क्रांतीकारक यशाचे श्रेय नवमाध्यमांच्या चतुराईने वापर करण्याकडे नक्कीच जाते.
            खास करुन सोशल मीडिया हे तरुणांना आकर्षित करणारे माध्यम आहे. युवक हा भावी परिवर्तनाचा अग्रदूत आहे. तोच विकासाच्या प्रक्रियेतील निर्णायक भागीदार आहे. मेक इन इंडिया व स्मार्ट अप इंडिया प्रकल्पातून महाराष्ट्र औद्योगिक क्रांतीच्या उंबरठयावर आहे. या कृषी औद्योगिक क्रांतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे. महासत्तेची मुद्रित व दृकश्राव्य  माध्यमे ही या सामग्र परिवर्तनाची साक्षीदार आहेत. पाऊस आला की पाणी वाहून जात असे पण नद्या नाल्यांचे पाणी शिवारात थांबते आहे त्यामुळे विहिरीची जलपातळी उंचावली आहे. याचे सर्व श्रेय जलयुक्त शिवार या क्रांतिकारी योजनांकडे जाते.
            सारांश, या सर्व चर्चेवरुन हे स्पष्ट होते की,शाश्वत विकासाची नवंमाध्यमांचा वापर हे नव्या युगाचे सूत्र आहे. आपल्या विकास कामांचा सर्वदूर प्रसार करण्याचे प्रयत्न  राज्य शासनाने  केला आहे. अचुकता ,संक्षेप आणि नेमकेपणा या त्रिसूत्रीवर आधारित करण्यात आला. बदलता महाराष्ट्र  प्रत्येक नागरींकापर्यंत पोहचविण्याची फलदायी ठरले आहे. कलात्मक नाविन्यपूर्ण आणि तेवढयाच अर्थपूर्ण अशा जनसंपर्क प्रयत्नांचे हे यश . त्यामुळे आधुनिक महाराष्ट्राला कलाटणी देणारे ठरले आहे. जलयुक्त शिवारातून महाराष्ट्रात दुसरी हरित क्रांती साकारत आहे. जनमनाची सोशल मिडियाव्दारे मशागत करुन युवकांना परिवर्तनाच्या अग्रभागी ठेवणारे हे धोरण नवा इतिहास घडविणार यात शंका नाही.
*******

                                      

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   280   सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आरटीओ कार्यालय राहणार  सुरु     नांदेड दि.  27  :-  सन  2023 2024  हे वित्तीय वर्ष दिनांक  3...