Friday, September 9, 2016

संवाद पर्व अभियानाद्वारे विविध योजनांचे
नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारण
नांदेड, दि. 9 :- जनतेला आनंद, उत्साह आणि ऊर्जा देणाऱ्या गणेशोत्सवाचा उपयोग सामाजिक जाणीव जागृती व प्रबोधनासाठी करता यावा यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संवाद पर्व अभियान घेण्यात येत आहे. या अभियानात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या सहकार्याने विविध योजनांच्या माहितीवर मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे.
या संवाद पर्व अभियानांतर्गत शुक्रवार 9 सप्टेंबर 2016 रोजी सायंकाळी 6.30 वा. जलयुक्त शिवार योजनेसंबंधीत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांची मुलाखत प्रसारीत होणार असून त्याचे पूर्नप्रसारण शनिवार 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9.10 मिनीटांनी होणार आहे. शनिवार 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा. संवाद पर्व या विषयी चर्चासत्राचे प्रसारण होणार असून यामध्ये शिक्षणाविषयी उमाकांत जोशी, सामाजिक कार्यकर्ते वसंत मैय्या, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, आकाशवाणी केंद्राचे केंद्र संचालक भिमराव शेळके सहभाग घेणार आहेत. रविवार 11 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वा. अवयवदान काळाची गरज या विषयावर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर शामकुंवर, डॉ. शिवाजी भोसले, डॉ. रमेश बनसोडे हे माहिती देणार आहेत. या सर्व मुलाखती आकाशवाणीचे केंद्र संचालक श्री. शेळके यांनी घेतल्या आहेत.
या संवाद पर्व अभियानाच्या मालिकेत शासनाच्या विविध विकासाच्या योजना, उपक्रमांच्या माहितीचे प्रसारण होणार आहे. नागरिकांनी या मालिकेचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी व नांदेड आकाशवाणी केंद्राचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.   

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...