Monday, September 26, 2016

मानार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन
नांदेड, दि. 26 :- मानार नदीकाठच्या जनतेने सतर्क राहून आपल्या पशुधनाची व मालमत्तेच्या सुरक्षिततेची उपाय योजना करावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे उत्तर विभाग कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की , उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटीमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे धरणाची क्षमता लक्षात घेऊन आश्यकतेनुसार पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे लिंबोटी, डोंगरगाव, हनमंतवाडी, चोंडी, दगडसांगवी, मजरेसांगवी, बोरी खु, उंबरज, संगमवाडी, कोल्हाची वाडी, शेकापूर, अंबेवाडी, जंमलवाडी, बाळंतवाडी व घोडज या नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टिने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लिंबोटी धरणाचे जलाशय खोल असल्याने या जलाशयात कोणीही पोहण्यास जावू नये असेही निवेदनात म्हटले आहे.

000000

No comments:

Post a Comment

 शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार 22 ते 26 एप्रिल या कालावधीत बंद छत्रपती संभाजीनगर, दि. 18 (विमाका): शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार, छत्रपत...