Wednesday, August 24, 2016

मानवी दिव्यदान : अवयवदान
         अवयवदानाविषयीच्या जनजागृतीसाठीच्या 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत महा-अवयवदान अभियान आयोजित केले आहे. त्यानिमित्त जिल्हयात जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजीत केले जाणार आहेत. त्याअनुषंगाने अवयवदानाबाबत जनजागृतीपर प्रसृत करण्यात आलेला लेख...
       
नादी काळापासून संपूर्ण जगामध्ये आणि वेगवेगळया धर्मामध्ये दानाला महत्त्व आहे. दान हे समाजातील गरजू किंवा अत्यंत  गरीब  व्यक्तीला दानशूर व्यक्तीकडून दिले जाते. दान म्हणजेच त्यापासून दान देणाऱ्याला आर्थिक फायदा अथवा त्यांची  प्रसिद्धी मिळत नाही. दान देणाऱ्याला मानसिक समाधान मिळते  व निती मुल्यात वृध्दी होते.
        जीवन आणि मृत्यू या दोन गोष्टीमध्ये मृत्यू हा आटळ आहे. त्याननंतर  वेगवेगळया जाती धर्मामध्ये वेगवेगळया पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावतात. परंतू देह व त्यातील अवयव हे अमूल्य आहेत. त्यांची अशा पद्धतीने जाळून राख करणे, किंवा जमिनीत माती करून नष्ट करणे, हे ज्या पद्धतीने आपण आजपर्यंत समाजात करत आहेत हे कितपत योग्य आहे? यावर समाजाने जागृत होऊन विस्तृत विचार करणे आवश्यक आहे. जर प्रत्येकांनी मृत्यू पूर्वी आपले अवयवदान करण्याची इच्छा असेल तर इच्छा संमती पत्र भरून दयावयाचे आहे. त्यानंतर आपणास एक ओळखपत्र दिले जाईल जे की , आपल्या सोबत 24 तास ठेवणे गरजेचे आहे.
      तसेच आपण दान केलेले अवयव हे फक्त गरजू व प्रतिक्षा यादीवरील रुग्णांना मोफत दिले जातील त्यासाठी शासनाची समिती मार्गदर्शन आणि नियंत्रण करत असते. अवयव दान देणाऱ्याचीतो अवयव घेण्याऱ्याची माहिती म्हणजे, कोणी कोणास अवयव दान दिले याची माहिती गुप्त ठेवली जाते.
       अवयवदान प्रामुख्याने तीन प्रकारे करता येते. जीवंतपणी  आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना आई, भाऊ, बही, मुले, पत्नी इत्यादींना. एक किडनी किंवा लिव्हरचा तुकडा अवयवच्या स्वरुपात दान करु शकतो. ब्रेन-डेथ झाल्यावर म्हणजेच मेंदूमृत झाल्यावर, त्यासाठी नेमून दिलेल्या समितीने अतिदक्षता   विभागात असलेल्या रुग्णाचा मेंदूमृत घोषित केल्यावर संबंधित रुग्णांच्या नातेवाईकानी अवयवदानासाठी संमती दयावयाची असते. त्यानंतर अशा रुग्णाचे दोन्ही किडनी, डोळे, फुप्फुसे, लिव्हर, स्वादूपिंड, हृदय, कानाचे  पडदे  तसेच  हाडे, त्वचा इत्यादी प्रकारच्या अवयवाचे दान करता येते. त्यामुळे अनेक प्रकारच्या गरजू रुग्णांना एका अवयव दात्याकडून  जीवनदान मिळते व मृत्यू झालेल्या व्यक्तींना अवयवदानाच्या रूपाने, अनेकांत जीवंत असल्याचा समाधान आणि आनंद मिळतो. मृत्यू झाल्यानंतर सहा तासाच्या आत आपण डोळे, त्वचा व हाडे दान करु शकतो. अवयवदान  करताना संमती पत्रात दोन व्यक्तीच्या साक्षीदार म्हणून सह्या आवश्यक आहेत. त्यापैकी एक साक्षीदार हा जवळचा नातेवाईक असणे आवश्यक आहे. आपल्या नातेवाईकाचा किंवा आपला एखादा अवयव दुसऱ्याच्या शरीरात मृत्यूनंतरही जीवंत राहतो. यासारख आनंदाची दुसरी बाब जीवनात असूच शकत नाही. त्यामुळे अवयव दान हे महादान आहे. 
                                                           -  डॉ. एच. आर. गुंटूरकर
                             (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक) एम. डी. (मेडीसीन)

000000

No comments:

Post a Comment

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...